विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........
पार्श्वभूमी
सत्तांतराच्या काळात विवीध शासकांनी वर्ण व्यवस्थेला विरोध केला नाही. मुस्लीम शासकांनि वर्णव्यवस्थेच्या सुधारणेसाठी लक्ष्य न देता धर्मांतराच्या माध्यमातुन आपली संस्कृती रुजवणेचा प्रयत्न केला. तसेच नंतरच्या काळात ब्रिटिश राज्यकर्ते व ब्रिटिश अधिकारी यांनी भारतीय जातीव्यवस्था, हिंदुधर्म यांचा अभ्यास केला जरूर परंतु त्यामागील त्यांचा प्रमुख उद्देश प्रशासकीय गरज हाच होता. भारतीय समाजजीवनाच्या अनाकलनामुळे अत्यंत चुकीची गृहीतके सुरूवातीच्या काळामध्ये ब्रिटिश अधिका-यांनी मनामध्ये बाळगल्यामुळे भटक्या विमुक्तांना याची फळे भोगावी लागली. ब्रिटिशांनी भटक्या विमुक्तांच्या सामाजिक परिस्थितीच्या अभ्यासावरून अनेक चुकीचे निष्कर्ष काढले. त्याचा परिणामी गुन्हेगार जमातीच्या कायद्याची रचना करण्यात आली. ब्रिटिश राज्यकर्ते व अधिकारी यांच्या मते भारतात जात आणि व्यवसाय या दोन्ही एकच गोष्टी आहेत. सुताराचा मुलगा सुतार व सोनाराचा मुलगा सोनार असतो आणि शतकानुशतकांपासून त्यांचा तोच व्यवसाय राहतो. धंदेवाईक गुन्हेगारांचा संदर्भात ही सज्ञा विचारात घेतली तर एक गोष्ट स्पष्ट होते की ज्या जमातीचे सदस्य पुरातन काळापासून गुन्हेगार आहेत, ते आपल्या जातीचा उपयोग गुन्हे करण्यासाठीच करतात. युरोपियन राज्यकर्त्यांनी जिप्सींसारख्या जमातींबद्दल कायदे करतांना असे म्हटले होते कि, “बदक हे बदकच असल्याने ते पाण्यातच जाणार. गुन्हेगार जमातीत जन्मलेली व्यक्ती ही गुन्हेगारच होणार
संस्थानिक व ब्रिटिश कालखंड
संस्थानिक व ब्रिटिश यांच्या सत्ता संघर्षा मध्ये भटक्या विमुक्तांनी स्वाभाविकपणे संस्थानिकांच्या बाजुने आपली ताकत लावली. संस्थानिक पुर्वापार विवीध जमातींचा वापर दहशत माजविण्यासाठी करत असत. संस्थानिकांच्यावरील ब्रिटिशांच्या वर्चस्वानंतर उमाजी नाईकांचे बंड, 1857 च्या उठावांच्या मध्ये भटक्या
No comments:
Post a Comment