विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........
शक्तिपीठांच्या कथा
पहिल्या कथेत दक्ष प्रजापतीची मुलगी सती (पार्वती) ही शंकराला दिलेली होती. दक्ष प्रजापती आणि शंकर या दोघांत वितुष्ट होते. पुढे दक्ष प्रजापतीने ‘बृहस्पतिसव’ नावाचा यज्ञ करावयाचा ठरविले. ह्या यज्ञाचे आमंत्रण शंकराला मात्र दिले नाही. तथापि सती मात्र पतीचा विरोध असताही हट्टाने त्या यज्ञप्रसंगी उपस्थित राहिली. त्या वेळी प्रत्यक्ष पित्याकडून झालेला अपमान असह्य होऊन सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वत:स जाळून घेतले. शंकराला हे समजल्यानंतर त्याने आपल्या जटेतून वीरभद्राला उत्पन्न केले व त्याच्याकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून दक्षालाही ठार मारले आणि दु:खावेगाने यज्ञस्थळी जाऊन शंकराने सतीचे निष्प्राण शरीर मस्तकावर घेऊन तांडव नृत्य सुरू केले. तांडव नृत्य म्हणजे शंकराचे विनाशकारी स्वरूप होय. भगवान शंकराला शांत करण्याच्या हेतूने विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या पार्थिवाचे अवयव तोडण्यास प्रारंभ केला. सतीच्या मृत देहाची अंग-प्रत्यंगे जेथे जथे पडली, तेथे तेथे शक्तिपीठे निर्माण झाली.
शक्तिपीठांच्या निर्मितीसंदर्भात जी दुसरी पुराणकथा आहे ती अशी : विष्णुभक्त अंबरीष राजाच्या एकादशीच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास मुनी आपल्या साठ हजार शिष्यांसह सकाळीच ह्या राजाकडे आले. त्या दिवशी राजाच्या व्रताचे उद्यापन होते. दुर्वास ऋषी वेळेवर न परतल्याने त्यांच्यासारख्या थोर अतिथीला सोडून व्रताचे उद्यापन करायचे, की अतिथी आल्यावर जेवून व्रत मोडायचे हा प्रश्न राजाला पडला. शेवटी राजाने तुळशीचे तीर्थ घेऊन उपवास सोडला आणि भोजनासाठी आलेल्या इतर लोकांना जेवू घातले. झाल्या प्रकाराने दुर्वास संतापले आणि त्यांनी राजाला शाप दिला, की ह्या व्रताचे फळ तुला मिळणार नाही आणि तुला शंभर जन्म घ्यावे लागतील. मग विष्णूने अंबरीषाला त्या शापापासून अभय दिले आणि विष्णूसह सर्व देवांनी दुर्वासांच्या शापवाणीने अंबरीषाला मिळणारे शंभर जन्म आपसात वाटून घेतले. त्यांपैकी एकावन्न जन्म देवीने स्वीकारले. त्यामुळे एकावन्न शक्तिपीठे निर्माण झाली.
==औंड्रपीठ== अशा या पीठांच्या उल्लेखात “औंड्रपीठ” चाही ऊल्लेख विवीध ग्रंथात, पुराणात आढळूण येतो. विष्णू पुराणात कमला स्त्रोत्राचा उल्लेख आढळूण येतो. सुख- समृद्धिच्या प्राप्तीसाठी कमाला स्त्रोत्राचे पठन लाभकारी ठरतो. या कमला स्त्रोत्रामध्ये सुध्दा आपणास देवीचा उल्लेख खालील प्रमाणे आढळतो.
कालिका त्वं कालिघाटे कामाख्या नीलपर्वत ।
विरजा ओड्रदेशे त्वं प्रसन्ना भव सुंदरि ॥
अर्थ- हे देवी, तु लालीघाटावर काली कालिका , नीलपर्वत पर कामाख्या आणि औड्र देशात विरजारूपात विराजमान आहेस. हे सुंदरी ! तु सदा आमच्यावर प्रसन्न रहा. तसेच कालिका पुराणानुसार प्रथम पीठ 'औंड्र पीठ' आहे.
"औंड्राख्यं प्रथमं पीठं द्वितीयं जालशैलकम्।
औंड्रपीठं पश्चिमे तु तथैवोंड्रेश्वरी शिवाम्।
कात्यायनीं जगन्ना मो ड्रेशं च प्रपूजयेता॥"
हे औण्ड्रपीठच ओडिसा असून येथे वडार समाजाचे पुर्वज आपल्या सुवर्ण कालखंडात आपल्या राज्यावर शासन करत होते. याजपुर येथे विरजा देवी या देवीचे स्थान असून उत्कल म्हणजेच उडीशाची ती प्रधान देवी आहे जिचे वर्णन ब्रह्मपुराण मध्ये खालील प्रमाणे आढळूण येते.
विरजे विरजा माता ब्रह्माणी संप्रतिष्ठिता।
यस्याः संदर्शनात्मर्त्यः घुनात्या सप्तमं कुलम्॥
असा आदिशक्ती व वडार समाजाच्या पुर्वजांचा प्राचिन संबंध असून वडार समाजातील सर्वांनी याची दखल घेवून या इतिहासाचा प्रसार वडार समाजात व इतर समाज बांधवांपर्यंत केला पाहिजे हे मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते.